दिसामाजी काहीतरी ते :
चाळीशी....माझ्या 'सवाई' स्वरयात्रेची
१९७४ ते २०१४
दरवर्षी डिसेंबर महिना सुरु झाला की संगीतप्रेमी जनतेमध्ये ' सवाई 'चे वारे सुसाट वाहू लागतात.गेली 40 वर्षे मी पण ह्या स्वरमयी वादळात यथेच्छ झोडपलो गेलो आहे. आचार्य अत्रे हे माझे साहित्य क्षेत्रातील जसे दैवत आहे तसेच पंडित भीमसेन जोशी हे पण माझे संगीत प्रांतातले दुसरे बलाढ्य दैवत आहे.त्यांच्या वरील प्रेम आदर आणि भक्तीमुळेच मी न चुकता सवाई गंधर्व संगीत महोत्सवास नियमितपणे हजेरी लावत आलो आहे.५० / ६० वर्षापूर्वी अण्णांच्या 'इंद्रायणी काठी ..'ह्या अभंगाने आणि मारुबिहाग मधील 'रसिया हो ना' ह्या बंदिशीने मी मंत्रमुग्ध झालो होतो. मी लहानपणीच 'ह्या ' संगीत महोत्सवाबद्दल बरेच ऐकले होते पण त्यासाठी पुण्याला येणे आवश्यक होते.आणि हा योग १९७४ साली आला नव्हे मी आणलाच.तेंव्हापासून ह्या सुरेल महोत्सवाच्या अनेक मनोरंजक सुखदायक आठवणी मनाच्या सेफ डीपोझीट लॉकरमध्ये जतन करून ठेवल्या आहेत.नुकत्याच सुरु झालेल्या ह्या कार्यक्रमाला दुस-या दिवशी मी गेलो खरा पण चिखल तुडवत परतलो आणि घरी डोक्यात 'सवाई ची ४० वर्षे' ह्या आठवणीं उफाळून आल्या.
१९७४ साली पहिल्यांदाच मी रेणुका मेमोरियल शाळेत एका मोठ्या रांगेत उभा राहिलो.बापरे गाण्याच्या कार्यक्रमाला सुद्धा 'क्यू' लावतात हे सगळे नवीन होते.माझ्या आठवणीप्रमाणे त्यावेळी भारतीय बैठकीचे सिझन तिकीट एका डीजीटमध्ये म्हणजे रुपये आठ फक्त होते.हे अगदी खर्र आहे आणि .एक रकमी मी खरीदले होते.प्रवेशद्वाराशीच रसिकांचे स्वागत यंत्राद्वारे गुलाबपाण्याचे फवारे उडवून केले जात होते.अहाहा :मंडपात गेल्यागेल्याच सुगंध दरवळा.लगेच स्वयंसेवकांनी प्रत्येकाला एक स्मरणिका अदा केली.मग अनेक परिचित मंडळी,हौशे नौशे,गवय्ये आणि खवय्येसुद्धा भेटले.नेहमीच्या रीतीरिवाजानुसार सनईचे मंजुळ सूर घुमू लागले.कार्यक्रम सुरु झाल्याची ती निशाणीच होती.मी मात्र अलीबाबाच्या गुहेत गेल्यासारखे वावरत होतो.कारण सगळच नवनवीन आनंददायक आणि आल्हाददायक होते.हे पाहू का ते पाहू आणि हे ऐकायचे का ते ऐकायचे अशी अवस्था होती.तेंव्हा हा कार्यक्रम जरी रात्री ९.३० ला सुरु होत असे तरी तो दुस-या दिवशी बरेचदा सूर्योदयानंतर संपे. आणि तिस-या म्हणजे शेवटच्या दिवशी तर कहर होत असे.पंडितजींची भैरवी झाल्याशिवाय आणि ती ऐकल्याशिवाय रसिकांना तृप्त झाल्यासारखे वाटत नसे.रात्रभर कडाक्याच्या थंडीतही कपाटातील सर्व थंडीचे खास कपडे घालून अनेक मंडळी येत आणि संगीतामध्ये तल्लीन/ रममाण होत.हे पाहिले आणि अनुभवलेसुद्धा.
ह्या कार्यक्रमामुळे मी अनेक जागतिक कीर्तीच्या कलावंताना पाहिले आणि ऐकले.हा सर्वात मोठा आनंद आयुष्यात मिळाला.मी( एकेकाळी) तबल्याचा विद्यार्थी होतो त्यामुळे उस्ताद अल्लारखा,पंडित सामताप्रसाद ,झाकीर हुसेन,कुमार बोस ,सपन चौधरी नामधारी,लतीफ अहमद शफात अहमद अशा नामवंत तबलीयांच्या हातातील जादू अनुभवता आली.अनेक थोर शास्त्रीय संगीत गायक वादक नृत्यकार ह्यांची कला पाहिली.श्रोत्यांची दाद मनापासून आणि देहभान विसरून असे हे पण मोठ्या उत्साहाने आणि कौतुकाने मी अनुभवले. भव्य मंडपातील स्वर यज्ञाप्रमाणेच मागील बाजूस मोठी खाद्य यात्रा नेहमी भरते.तेथे गवय्ये आणि खवय्ये ह्यांची जुगलबंदी पाहायला मिळते.तृप्त कानाप्रमाणेच तृप्तीचा ढेकर देईपर्यंत सर्व काही मिळते.जिभेचे लाड पुरवायला कोणीही मागेपुढे पाहत नाही.गाणारे कोण आणि खाणारे कोण हेच कळत नाही. भाजणीच्या थालीपीठपासून ते उकडीच्या मोदकापर्यंत आणि सोल कढीपासून ते मसाला दुधापर्यंत सर्व मिळते'.काही नाही ' हा शब्दच नाही.बरेचजण वनभोजनाला आल्याप्रमाणे ह्या खाद्ययात्रेचा आनंद घेतात.मी पण त्याला अपवाद नाही.तीन दिवस मौज मस्ती आणि मजा असते.
पूर्वी कार्यक्रम सुरु असतानाच मध्यरात्री दुस-या दिवशीचे ताजे वृत्तपत्र येई आणि कित्येक लोक श्रवण आणि वाचन हा आपला कार्यक्रम तेथेच उरकत.असत.काही सुखदुखाच्या बातम्या कळत.अभिनेत्री स्मिता पाटील हिच्या निधनाचे वृत्त,विमान अपघात झाल्यावरही तत्कालीन पंतप्रधान श्री मोरारजीभाई देसाई एका शेतातून पायी पायी गेले ह्या बातम्या मी मंडपातच प्रथम वाचल्या होत्या,एका वर्षी पाऊस खूप झाल्याने एका कार्यालयातून पाट आणून कार्यक्रम पार पाडला तर एकदा बराच वेळ दिवस समजून रात्रीच लाईट गेले तरीपण श्रोत्यांनी जराही विचलित न होता तल्लीनतेने व्हायोलीन महिला कलाकाराचे 'नरवर कृष्णासमान' हे नाट्यगीत ऐकले.अशा कितीतरी आठवणी आहेत पण वेळ आणि जागा ह्यांचे व्यस्त प्रमाण आहे.
कार्यक्रमाची सांगता तिस-या दिवशी होई.आभारप्रदर्शन झाले की पंडित भीमसेन जोशी पांढ-या शुभ्र वस्त्रात आणि खांद्यावर लाल रंगाची नक्षीदार शाल घेत व्यासपीठावर येत.त्याच वेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडट ऐकू येई.मग भीमसेनजी कधी राग तोडी तर कधी रामकली ,ललत आळवून अभंग किंवा एकादे कानडी भजन भक्तीगीत गात आणि शेवटी भैरवी म्हणत.पुन्हा एकदा टाळ्यांची त्सुनामी अनुभवायला मिळे. क्षणार्धात शांतता पसरे आणि श्रोते उभे राहून सवाई गंधर्व ह्यांच्या मधुर आवाजातील किराणा घराण्याची अत्यंत लोक् प्रिय भैरवी भक्तिभावाने ऐकत.आणि तीनचार दिवस साठवलेले आनंदाश्रू पुसत पुसतच मंडपाबाहेर जात.
शुभप्रभात ......दिनांक १४ डिसेंबर२०१४
चाळीशी....माझ्या 'सवाई' स्वरयात्रेची
१९७४ ते २०१४
दरवर्षी डिसेंबर महिना सुरु झाला की संगीतप्रेमी जनतेमध्ये ' सवाई 'चे वारे सुसाट वाहू लागतात.गेली 40 वर्षे मी पण ह्या स्वरमयी वादळात यथेच्छ झोडपलो गेलो आहे. आचार्य अत्रे हे माझे साहित्य क्षेत्रातील जसे दैवत आहे तसेच पंडित भीमसेन जोशी हे पण माझे संगीत प्रांतातले दुसरे बलाढ्य दैवत आहे.त्यांच्या वरील प्रेम आदर आणि भक्तीमुळेच मी न चुकता सवाई गंधर्व संगीत महोत्सवास नियमितपणे हजेरी लावत आलो आहे.५० / ६० वर्षापूर्वी अण्णांच्या 'इंद्रायणी काठी ..'ह्या अभंगाने आणि मारुबिहाग मधील 'रसिया हो ना' ह्या बंदिशीने मी मंत्रमुग्ध झालो होतो. मी लहानपणीच 'ह्या ' संगीत महोत्सवाबद्दल बरेच ऐकले होते पण त्यासाठी पुण्याला येणे आवश्यक होते.आणि हा योग १९७४ साली आला नव्हे मी आणलाच.तेंव्हापासून ह्या सुरेल महोत्सवाच्या अनेक मनोरंजक सुखदायक आठवणी मनाच्या सेफ डीपोझीट लॉकरमध्ये जतन करून ठेवल्या आहेत.नुकत्याच सुरु झालेल्या ह्या कार्यक्रमाला दुस-या दिवशी मी गेलो खरा पण चिखल तुडवत परतलो आणि घरी डोक्यात 'सवाई ची ४० वर्षे' ह्या आठवणीं उफाळून आल्या.
१९७४ साली पहिल्यांदाच मी रेणुका मेमोरियल शाळेत एका मोठ्या रांगेत उभा राहिलो.बापरे गाण्याच्या कार्यक्रमाला सुद्धा 'क्यू' लावतात हे सगळे नवीन होते.माझ्या आठवणीप्रमाणे त्यावेळी भारतीय बैठकीचे सिझन तिकीट एका डीजीटमध्ये म्हणजे रुपये आठ फक्त होते.हे अगदी खर्र आहे आणि .एक रकमी मी खरीदले होते.प्रवेशद्वाराशीच रसिकांचे स्वागत यंत्राद्वारे गुलाबपाण्याचे फवारे उडवून केले जात होते.अहाहा :मंडपात गेल्यागेल्याच सुगंध दरवळा.लगेच स्वयंसेवकांनी प्रत्येकाला एक स्मरणिका अदा केली.मग अनेक परिचित मंडळी,हौशे नौशे,गवय्ये आणि खवय्येसुद्धा भेटले.नेहमीच्या रीतीरिवाजानुसार सनईचे मंजुळ सूर घुमू लागले.कार्यक्रम सुरु झाल्याची ती निशाणीच होती.मी मात्र अलीबाबाच्या गुहेत गेल्यासारखे वावरत होतो.कारण सगळच नवनवीन आनंददायक आणि आल्हाददायक होते.हे पाहू का ते पाहू आणि हे ऐकायचे का ते ऐकायचे अशी अवस्था होती.तेंव्हा हा कार्यक्रम जरी रात्री ९.३० ला सुरु होत असे तरी तो दुस-या दिवशी बरेचदा सूर्योदयानंतर संपे. आणि तिस-या म्हणजे शेवटच्या दिवशी तर कहर होत असे.पंडितजींची भैरवी झाल्याशिवाय आणि ती ऐकल्याशिवाय रसिकांना तृप्त झाल्यासारखे वाटत नसे.रात्रभर कडाक्याच्या थंडीतही कपाटातील सर्व थंडीचे खास कपडे घालून अनेक मंडळी येत आणि संगीतामध्ये तल्लीन/ रममाण होत.हे पाहिले आणि अनुभवलेसुद्धा.
ह्या कार्यक्रमामुळे मी अनेक जागतिक कीर्तीच्या कलावंताना पाहिले आणि ऐकले.हा सर्वात मोठा आनंद आयुष्यात मिळाला.मी( एकेकाळी) तबल्याचा विद्यार्थी होतो त्यामुळे उस्ताद अल्लारखा,पंडित सामताप्रसाद ,झाकीर हुसेन,कुमार बोस ,सपन चौधरी नामधारी,लतीफ अहमद शफात अहमद अशा नामवंत तबलीयांच्या हातातील जादू अनुभवता आली.अनेक थोर शास्त्रीय संगीत गायक वादक नृत्यकार ह्यांची कला पाहिली.श्रोत्यांची दाद मनापासून आणि देहभान विसरून असे हे पण मोठ्या उत्साहाने आणि कौतुकाने मी अनुभवले. भव्य मंडपातील स्वर यज्ञाप्रमाणेच मागील बाजूस मोठी खाद्य यात्रा नेहमी भरते.तेथे गवय्ये आणि खवय्ये ह्यांची जुगलबंदी पाहायला मिळते.तृप्त कानाप्रमाणेच तृप्तीचा ढेकर देईपर्यंत सर्व काही मिळते.जिभेचे लाड पुरवायला कोणीही मागेपुढे पाहत नाही.गाणारे कोण आणि खाणारे कोण हेच कळत नाही. भाजणीच्या थालीपीठपासून ते उकडीच्या मोदकापर्यंत आणि सोल कढीपासून ते मसाला दुधापर्यंत सर्व मिळते'.काही नाही ' हा शब्दच नाही.बरेचजण वनभोजनाला आल्याप्रमाणे ह्या खाद्ययात्रेचा आनंद घेतात.मी पण त्याला अपवाद नाही.तीन दिवस मौज मस्ती आणि मजा असते.
पूर्वी कार्यक्रम सुरु असतानाच मध्यरात्री दुस-या दिवशीचे ताजे वृत्तपत्र येई आणि कित्येक लोक श्रवण आणि वाचन हा आपला कार्यक्रम तेथेच उरकत.असत.काही सुखदुखाच्या बातम्या कळत.अभिनेत्री स्मिता पाटील हिच्या निधनाचे वृत्त,विमान अपघात झाल्यावरही तत्कालीन पंतप्रधान श्री मोरारजीभाई देसाई एका शेतातून पायी पायी गेले ह्या बातम्या मी मंडपातच प्रथम वाचल्या होत्या,एका वर्षी पाऊस खूप झाल्याने एका कार्यालयातून पाट आणून कार्यक्रम पार पाडला तर एकदा बराच वेळ दिवस समजून रात्रीच लाईट गेले तरीपण श्रोत्यांनी जराही विचलित न होता तल्लीनतेने व्हायोलीन महिला कलाकाराचे 'नरवर कृष्णासमान' हे नाट्यगीत ऐकले.अशा कितीतरी आठवणी आहेत पण वेळ आणि जागा ह्यांचे व्यस्त प्रमाण आहे.
कार्यक्रमाची सांगता तिस-या दिवशी होई.आभारप्रदर्शन झाले की पंडित भीमसेन जोशी पांढ-या शुभ्र वस्त्रात आणि खांद्यावर लाल रंगाची नक्षीदार शाल घेत व्यासपीठावर येत.त्याच वेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडट ऐकू येई.मग भीमसेनजी कधी राग तोडी तर कधी रामकली ,ललत आळवून अभंग किंवा एकादे कानडी भजन भक्तीगीत गात आणि शेवटी भैरवी म्हणत.पुन्हा एकदा टाळ्यांची त्सुनामी अनुभवायला मिळे. क्षणार्धात शांतता पसरे आणि श्रोते उभे राहून सवाई गंधर्व ह्यांच्या मधुर आवाजातील किराणा घराण्याची अत्यंत लोक् प्रिय भैरवी भक्तिभावाने ऐकत.आणि तीनचार दिवस साठवलेले आनंदाश्रू पुसत पुसतच मंडपाबाहेर जात.
शुभप्रभात ......दिनांक १४ डिसेंबर२०१४